विरोध योग्य वेळीच महत्त्वाचा
विरोध योग्य वेळीच महत्त्वाचा
••••••••••••••••
विरोध नकारात्मक शब्द असला तरी सकारात्मक निकालात करीता विरोध योग्य पद्धतीने व योग्य वेळी झालाच पाहिजे. ध्येय व नियोजनात मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरत असतं आणि हे करताना स्वत:चे चिंतन व अभ्यास असावा कदाचित विषयांवर चिकित्सा, शंका काढल्यास विरोधही होईल. आपल्यात शंका काढण्यास देखील ज्ञान असले पाहिजे कुणीतरी एखाद्या विशिष्ट व्यक्ती,समुह म्हणत आहे म्हणून तसे करावे त्यापुर्वी त्याची विश्वासहार्याता तपासुन किती उच्य कोटींची आहे ते महत्त्वाचे आहे. सदरील विचार ध्येय, उद्दिष्टे; व्यक्ती व सामाजिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने असल्यास त्यात स्वत:ला समर्पीत करणं योग्य परंतु विचार ध्येय जर व्यक्ती व सामाजिक उत्तरदायित्वाच्या विसंगत असतील तर मोठा विरोध महत्त्वाचा आहे जर वेळी विरोध केला नाही तर सदर व्यक्ती वा समुह अधःपतना कडे वाटचाल करीत असतात. व्यक्ती वा समुह कितीही महान असोत त्यांच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची पुष्प अर्पण करणे म्हणजे माणसिक गुलामगिरी निर्माण करणे होय. म्हणून स्वत: आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवूणं आपला स्वाभिमान, बुद्धी, विवेक,ताकद आणि संघर्ष
योग्य पद्धतीने करुन सामाजिक बदल घडवण्याची ती सुरुवात असते.
Comments